Posts

Showing posts from January, 2022

"मातृभूमी"

         मातृभूमी मातृभूमी साठीच जन्मले ते झाले महान,थोर सोसल्या खूप यातना होता पारतंत्र्याचा घोर//१//      मातृभूमीला सलाम केला      तिच्या सेवेत होऊन लीन      लढले स्वातंत्र्यासाठी खूप      जुलूम अन्याय सोसून //२// मातृभूमीशी राखून ईमान त्यांचे विचार हटले नाही मागे प्राण पणाला लावून लढले दान दिले जीवन अवघे. //३//       मातृभूमीला श्रेष्ठ मानून       तिच्यासाठी तुरुंगवासही भोगला       रक्षण करण्या मातृभूमीचे      महापुरुषांनी देहही त्यागला//४// मातृभूमीस केले प्रथम वंदन रचला इतिहास मोठ्या कार्याचा गेले महान होऊन जगात ठसा उमटविला आपल्या कर्तृत्वाचा//५// कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. दिनांक २३/०७/२०२०. विषय: जीवन कसे वर्णावे सार जीवनाचे जीवन कधी सुखाचे कधी दुःखाचे कधी जीवनात सुखांची जत्रा कधी वाढतो संकटांचा खत्रा//१// आत्म ज्ञान जीवनात मिळते आयुष्य एका वळणावर थांबते वाटा सुखाच्या शोधताना पुढच्या दिशा बदलतात आपल्या मनाच्या//२// स्वप्ने पळवतात...

"भारतीय प्रजासत्ताक दिन"

 "भारतीय प्रजासत्ताक दिन" सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी 2022. आपला प्रजासत्ताक दिन आपण या दिवसाला प्रजासत्ताक दिन असे का म्हणतो? त्याचे खरे उत्तर म्हणजे प्रजा म्हणजे जनता आणि सत्ताक म्हणजे सत्ता स्वातंत्र्य जनतेला मिळालेली सत्ता म्हणजे प्रजासत्ताक खऱ्या अर्थानं या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाची राज्यघटना अमलात आली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटना उदयास आणली. आपल्या हाती पूर्णपणे सत्ता सोपवून इंग्रज त्यांच्या देशी निघून गेले. त्याआधी त्यांनी आपल्यावर खूपच निर्दयी व्यवहार केला. आपल्याला स्वातंत्र्य मिळावे म्हणुन अनेक देशभक्त स्वतःहून पुढे येऊन देशासाठी लढले काहीं फासावर गेले. त्यांचे विचार एकच होते ध्येय सुद्धा नेकच होतें ते फक्त आणि फक्त देशाला स्वातंत्र्य जुलूम शाही दडपशाही त्यांना सहन झाली नाही. म्हणून देशाच्या देशभक्तांनी मिळून एकच विचार केला तो म्हणजे स्वातंत्र्य. आपल्याला स्वातंत्र्य देऊन स्वतःचे बलिदान दिले. असे महात्मे असे क्रांतिकारक आणि असे देशहितकारक पुन्हा होणे नाही. स्व...

"भरती"

 "भरती" भरतीसाठी अर्ज येतात हजारांवर उपासमारीची वेळ येते बेरोजगारांवर कसे बसे पोहचतात ठिकाणावर काय बरे वाटत असेल त्यांच्या मनावर! रोजगार वाढले तरी बेकारी कुठवर चालेल अशी बेरोजगारी अर्जदार येतात, कुठून, कुठून कधी, कधी गाडी जाते सुटून ! गरज नोकरीची असते म्हणून प्रश्न उदर निर्वाहाचा सतावतो म्हणून होते गर्दी अतोनात बेकारांची ओळखावी गरज खरी बेकारांची! ठेऊन विश्वास, त्या विधात्यावर नको नको ते प्रश्न असतात मनावर बेकारीची कुऱ्हाड, घेऊन डोक्यावर जगतो बेकार, नोकरीच्या आशेवर !    कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन ©® दिनांक २०/०१/२०२२

"एक आशा गरीब की"

 "एक आशा गरीब की" कुछ ज्यादा नहीं होती एक आशा गरीब की बस दो वक्त की रोटी भुख मिटे बस पेट की//१// उम्मीद नहीं ज्यादा पाने की भूख नहीं ज्यादा खाने की जिन्दगी सवर जाए हमारी बस इतनिसी आसं जिने की//२// मन उदास ना रहे कभी इतना ही हम चाहते है धन की लालसा से दूर आठो पहर रहना चाहते हैं//३// गरीब को मिलती चैन की सांस नही रहती कभी जिन्दगी उदास मनचाहा मिले ना मिले सूख जीवन में कोई गम नहीं, जीवन बिते आशावो में//४// आशा ना करे निराशा कभी पूरी हो हर ख्वाहीशे सभी दुःख दर्द सब भुलाकर जिते "गरीब"जिन्दगी का हर गम पिते//५// दिनांक १८/०१/२०२२   कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद. @जनार्दन ©®

"पहाट"

 "पहाट" नवी पहाट, नवी वाट घेऊन आली, रम्य प्रभा गोड लागते, ऊब थोडीशी रवि किरणे, वाढविती शोभा//१// दवबिंदूत न्हाली सारी धरणी किलबिलाट एकाहून एक सरस जागली पक्ष्यांची कोकिळा राणी कुहू, कुहु गात रम्य गाणी. //२// नयनरम्य दृश्य मनोहारी भासते स्वच्छंद आभाळ सारे खुलते निसर्गाची किमया, दिसतें न्यारी बंद कळीतून , फुल फुलते //३// रान वेली, झाडे झूडपे  सारेच कसे, नवे दिसतें प्रसन्न होते,धरणी सारी स्वागत जणू, पहाटेचं करते//४// कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.@जनार्दन ©®

सुबह हूयी

     रात बीत गयी देखो      फिर सुबह हूयी    जाग गये हम सारे   घडी देखो आयी नयी //१// सपने नये, वादे नये दिन की हो गयी शुरुवात सर्दियो में भी देखो हलकी हो रही रिमझिम सी बरसात //२// मौसम अलग हो रहा हैं कहीं सर्दी कही गरमी बदलाव हर दिन अलग कही पानी कहीं बर्फ हैं जमी//३//    कवी: जनार्दन बाळा गोरे औरंगाबाद.@जनार्दन

"मकर संक्रांत"

 दिनांक १४/०१/२०२२.       "मकर संक्रांत" आज मकर संक्रांत या गोड दिवसाच्या निमित्ताने आज लिहावे असे वाटले म्हणून लेखास सुरुवात केली. मकर संक्रांत म्हणजे तीळ गुळ घ्या गोड गोड बोला. असे साधारणतः आपण बोलत असलो तरी आपण ते तेवढ्या दिवसा साठी मर्यादित ठेवतो. सणाच्या निमित्ताने का होईना नात्यातील कटुता काही दिवसांसाठी गोडव्यात रुपांतरीत होते. नंतर आपण "जैसे थे"वैसे वागू लागतो याला काही अर्थ उरत नाही. मला तर असे वाटते की आपल्यात कधीही कटुता येऊ नये. शब्दांचे मोल प्रत्येकाने जाणले पाहिजे. नुसतेच जाणुन उपयोग नाही तर ते अमलात आणणे हाच खरा मानव धर्म आहे. तिमिरातून तेजाकडे जाण्यासाठी आडवाटेनं न जाता कठोर तपश्चर्या करून म्हणजे परिश्रम करून आपल्यातील कलागुणांना प्रसारीत करून जीवनातील तेज निर्माण करून पुढें जाण्यात खरी मजा असते. स्वतःला सिद्ध करुन, जीवनातील दुःखे दुर सारून पुढचा मार्ग काढत जावे.           मकर संक्रांतीच्या निमित्ताने हे लेखन करण्याचा विचार मनात आला आणि त्यानिमित्ताने मी लिहू शकलो. बोलण्यात आणि वागण्यात गोडवा हा कायम स्वरुपी राहील ही दक्षता प्...