"ओळख कवीची"

 "ओळख कवीची"

विचारांच्या वाटा, सागराच्या लाटा

स्मितहास्य गाली, मुखी प्रसन्न छटा

ओळख अशी कवीची असते

मर्म जीवनाचे, कविलाच कळते//१//

मोजकेच बोलणे, विचारांना तोलने

भाव मनातील, लिहून काढणे

तळमळ साऱ्यांची,मनात वसते 

ओळख अशी कवीची असते//२//

पाने, फुले, रान वेली

ऊन, पाऊस आणि सावली

विषयांची कमी कधी नसते

ओळख अशी कवीची असते//३//

मन होऊन पाखरू उडे

वाचन, लिखाणाचे वेड जडे

रचनेत ज्याला सुख गवसते

ओळख अशी कवीची असते//४//

छंद जोपासून, मिळवतो शांती

करतो निर्माण कवितेची उत्क्रांती

दयेचे पाझर, मनात दाटते

ओळख अशी कवीची असते//५//

दिनांक २७/०९/२०२१

कवी: जनार्दन बाळा गोरे

औरंगाबाद.

@जनार्दन

©®

Comments

  1. मनस्वी धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"पासिंग नंबर"

"मौन निमंत्रण"