"दिवाळी आणि फटाके"
"फटाके आणि दिवाळी" फटाके वाजवून दिवाळी साजरी करण्यात उपयोग नाही. फटाके फोडून दिवाळी साजरी करणे ही पद्धतच मुळात चुकीची आहे. त्याला कारणही तसेच आहे. फटाके फोडण्याच्या नादात आपण एवढे मग्न होतो की, आपले ईतर ठिकाणी लक्ष विचलित होते. रस्त्यावरून वाहने आणि मुकी बिचारी जनावरे जात असताना. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. फटाक्यांचे आवाज हे कर्णकर्कश असतात. त्यानं कानावर परीणाम होऊ शकतो. तसेच फटाक्यांच्या धुरानं प्रदूषण वाढते. दिवे लावून दिवाळी साजरी करणे ही काळाची गरज आहे. खरी दिवाळी दिव्यांची आहे. फटाक्यांची नाही. तेंव्हा सर्वांनी दिव्यांच्या दिवाळीचे स्वागत करावे. व दरवर्षी फक्त दिवे लावून दिवाळी साजरी करावी. असे केल्याने अनेक गोष्टींना आळा बसेल. वातावरण दूषित होणार नाही. सर्व प्राणीमात्र भितीमुक्त जीवन जगतील. दिवाळीच्या फटाक्यांच्या खर्चात वाढ न करता तो पैसा खाण्यापिण्यात किंवा एखाद्या गरजवंताला मदत करून उपयोगात आणता आला तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल असे मला वाटते. विशेषतः लहान मुल फटाके फोडताना इतके हरवून जातात की, आपल्याला ईजा होईल याचे भान त्यांना राहत नाही. मोठी माणसे देखील लहा...